Thursday, December 12, 2019

Inspirational - A Short Story Book 30

Inspirational - A Short Story Book 29

Inspirational - A Short Story Book 28

Inspirational - A Short Story Book 27

Inspirational - A Short Story Book 26

Inspirational - A Short Story Book 25

Inspirational - A Short Story Book 24

Inspirational - A Short Story Book 23

Inspirational - A Short Story Book 22

Monday, October 21, 2019

एक काळ


एक राजा असतो त्याला चांगल्या जातीचे घोडे पाळण्याचा खूप शौक असतो त्याचा कडे एक खूप सुंदर आणि रुबाबदार घोडा असतो राजा त्याचे खूप लाड करत असतो पण काही दिवसांनी तो दुसरा घोडा घेऊन येतो आणि पहिल्या घोड्या पेक्षा त्याचे जास्त लाड करायला लागतो त्यावर एक दिवस नवा घोडा जुन्या घोड्याला विचारतो मित्रा राजा दही तुझे लाड करायचा असे मी ऐकले आहि आजकाल तो माझे कड करतो असे का ? त्यावर जुना घोडा म्हणतो प्रत्येकाचा एक काळ असतो आणि प्रत्येकाला एक संधी मिळत असते

तात्पर्यः प्रत्येकाचा एक काळ असतो

Wednesday, October 16, 2019

सकारात्मक दृष्टिकोन


एकदा एका गावात दोन मैत्रिणी राहत असतात त्यांना राम आणि श्याम नावाची मुले असतात राम आणि श्याम दोघे चांगले मित्र असतात एक दिवस राम आणि श्याम दोघे एक दिवस पैज लावतात झाडावर कोण जास्त वर जाऊ शकतो दोघे खूप वर जातात पण तेवढयात जोराचे वादळ चालू होते दोघे वर अडकून बसतात तेवढ्यात दोघांच्या आया तिथे येतात रामची आई म्हणते फांदीला घट्ट पकडून बस्स आणि श्यामची  आई म्हणते घाबरू नकोस हळू हळू खाली उतर थोड्या वेळाने राम घसरून पडतो आणि श्याम हळू हळू खाली उतरतो रामच्या आईच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ऐकली आणि तो पडला.या उलट श्यामच्या आईने उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ऐकली

ताप्तर्य: "वास्तु करी तथास्तु" वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते त्यामुळे तुम्ही जसे बोलाल तसेच होते तुम्ही जर सकारात्मक बोलला तर सकारात्मक आणि नकारात्मक बोलला तर सकारात्मक घडते

कबूतर आणि मुंगी


एक दिवस कबूतर आणि मुंगी मध्ये बोलणे चालू असताना अचानक ते संवाद एकदम विवादामध्ये रूपांतरित होतो कबूतर म्हणतो जर मी मागच्या वेळेस तुला वाचवले म्हणून तर आज तू जिवंत आहेस त्यावर मुंगी म्हणते त्याची  परतफेड मी तुझा जीव वाचवून केली होती असाच वाद वाढत जातो आणि परत तोच प्रसंग येतो परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली पण कबुतराचा अहंकार आड येतो तो म्हणतो यावेळेस मी मुंनीला वाचवणार बघू माझ्या शिवाय ती जीव वाचवू शकते का थाड वेळ प्रयत्न करून मुंगी जीव सोडते तो पर्यंत तिथे पारधी आलेला असतो तो संधीचा फायदा उचलतो आणि कबुतराला मारून टाकतो तिटकाढे झाड हे सागर बगत असते त्याला कबुतर मेल्याचं दुःख होतंच पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं

ताप्तर्य : अहंकार सद्सदबुद्धीचा नाश करते

विनम्र

पुराणकाळात एक राजा होता कल्की त्याची ख्याती चारी दिशांना पसरत होती एक दिवस विष्णू आणि लक्ष्मी त्याची परीक्षा घ्यायची ठरवतात तो एक दिवस सकाळी उठतो आणि एका सुंदर स्त्रीला बाहेर जाताना बघतो तो तिला विचारतो आपण कोण आहात? ती स्त्री म्हणते मी लक्ष्मी आहे कल्की तिला जाण्याची परवानगी देतो मग दुसरा पुरुष बाहेर जाताना बघतो तो त्याला विचारतो आपण कोण आहात?

तो म्हणतो मी कुबेर आहे कल्की त्याला पण जाण्याची परवानगी देतो मग त्याला तिसरा पुरुष बाहेर जाताना बघतो तो त्याला पण विचारतो आपण कोण आहात? तो उत्तर देतो मी न्याय आहे कल्की त्याला पण जाण्याची परवानगी देतो त्याला मग चौथा परुष बाहेर जाताना दिसतो तो त्याला पण विचारतो आपण कोण आहात?  तो म्हणतो मी विनम्र आहे कल्की त्याला म्हणतो मी इतक्या वर्षात जे काही कमावले ते माझ्याकडे तू होतास म्हणून त्यामुळे मी तुला विनंती करतो को तू इथेच रहा विनम्र तिथेच थांबतो ते बघून बाहेर गेलेले लक्ष्मी, कुबेर आणि न्याय परत येतात आणि तो परीक्षेत यशस्वी ठरतो

तात्पर्य :- सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे

झोपडी


मध्य प्रदेशातील इंदोर गावात एक कल्की नावाचा व्यापारी राहत होता त्याचा धंदा खूप उत्तम चालला होता त्याने एक खानावळ चालू केली होती त्याच्या खाणावळाची ख्याती ऐकून खूप लांबून लांबून लोक येत होती एकदा इंदोर मध्ये काही लोक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येतात कार्यक्रम संपल्यानंतर तो त्यांना जेवण्यासाठी निमंत्रण देतो त्यांना अपेक्षा असते की तो त्यांना त्याच्या प्रसिद्ध खानावळीत खाऊ घालेल पण तो त्यांना एका झोपडीत घेऊन जातो.

तिथे तो त्यांना स्वतः वाढतो आणि ते सुद्धा खूप मनसोक्त जेवतात त्याची जशी ख्याती होती तसेच  जेवण खूप चविस्ट असते पण सगळ्यांना एकाच प्रश्न पडलेला असतो की त्याने झोपडीत का नेले. एक जण त्याला विचारतो तेंव्हा तो उत्तर देतो जेंव्हा मी या गावात आलो तेंव्हा माझ्या जवळ राहायला जागा नव्हती खायला पैसे नव्हते आम्ही खूप कष्ठातून हा व्यवसाय चालू केला तेंव्हा आमच्या सुख दुःखात ह्या झोपडीने आम्हाला साथ दिली हिचे खूप उपकार आहेत आमच्यावर त्यामुळे जेंव्हा कधीपण खूप चांगला क्षण असेल तो आम्ही तेथे साजरा करतो 

तात्पर्य - आपण आपल्या मूळ गोष्टीना विसरू नये. ज्यांनी संकटकाळात आपली मदत केली त्यांना कधीच विसरू नये.

मैञी


एक खेकडा समुद्राच्या काठी खूप आनंदाने चालत होता चालताना त्याच्या पायाचे ठसे उमटत होते ते बघताना त्याला खूप आनंद होत होता तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि त्याचे पायाचे सगळे ठसे मिटवून टाकते ते पाहून तो खूप दुःखी होतो आणि लाटेला म्हणतो मी तुला तर खूप चांगली मैत्रीण समाजात होतो मग तू असे का केले त्यावर लाट म्हणते मागे एक मासेमार तुझ्या ठस्यांचा मागोवा घेत तुझा पाठलाग करत आहे ते मी पहिले आणि तुझे सगळे ठसे मी बुजवून टाकले

तात्‍पर्य: मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

सोन्‍याची कुदळ


कल्की नावाचा एक शेतकरी होता ज्याला राम आणि श्याम अशी दोन मुले होती एक दिवस त्याने मुलांना बोलावले आणि सांगितले आता माझे आता वय झाले आहे त्यामुळे चारधाम करायची माझी इच्छा आहे त्या आधी माझ्या कडे एक सोन्याची कुदळ तुम्ही ती जेवढी वापराल तेवढे सोने निघेल आणि आणि दुसरीकडे सगळी धन-संपत्ती आहे तुम्ही ठरवा कुणाला काय पाहिजे राम विचार करतो कि कुदळ घेऊन मी काय करू त्यापेक्षा मी धन-संपत्ती घेतो आणि श्याम विचार करतो की कष्टाळू आहे त्यामुळे मी कुदळ घेतो दोघांचे एकमत होते आणि कल्की दोघांचा निरोप घेऊन चारधामला निघून जातो

राम त्याच्या कडचा पैसा पाण्‍यासारखा खर्च करायला सुरुवात करतो आणि काही काळातच गरीब होतो दुसरी कडे श्याम शेती करायला सुरुवात करतो ती कुदळ काही सोन्याची होत नाही पण त्याला त्याच्या कष्टावर विश्वास असतो आणि त्या वर्षी त्याची शेती खूप चांगली होते गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला त्यानंतर त्याला वडिलांच्या बोलण्याचा अर्थ कळतो की कष्टाचे सोने होते

तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते.

कर्माचे फळ


एक शेठजी अत्यंत दयाळू होते. त्यांच्याकडे पैसे मागायलेल्या कुठल्याही व्यक्तीला ते पैसे देत असे भले तो परत करणार किंवा नाही शेठजी फक्त त्याला एवढेच विचारायचे तू पैसे या जन्मात परत करणार आहेस कि पुढच्या जन्मात ज्यांची पैसे परत करायची नियत नव्हती ते पुढच्या जन्मात सांगून मोकळे व्हायचे एकदा एक चोर शेठजींकडे पैसे मागण्यासाठी पोहोचला. शेठजीने त्यालाही तोच प्रश्न विचारला, पैसे परत कधी देणार या जन्मात की पुढच्या? चोर म्हणाला पुढील जन्मात. शेठजीने पैसे काढून त्याला दिले. शेठजीच्या तिजोरीत भरपूर पैसे असल्याचे चोराने पाहिले. चोराने शेठजीच्या घरी चोरी करण्याची योजना आखली.

रात्री सर्वजण झोपल्यानंतर चोर शेठजीच्या घरात घुसला. चोर गायीच्या  गोठ्यात उभा राहून योग्य वेळेचे वाट पाहत होता, तेवढ्यात त्याच्या कानावर दोन्ही गायीचे बोलणे पडले. दोन गायी एकमेकींशी बोलत होत्या. एका गायीने दुसऱ्या गायीला विचारले तू आजच येथे आलीस का? दुसऱ्या गायीने उत्तर दिले हो, मी मागील जन्मात शेठजींकडून पैसे घेतले होते आणि ते आता फेडण्यासाठी आले आहे. तू केव्हापासून येथे आहेस? पहिल्या गायीने उत्तर दिले मला येथे पाच वर्ष झाले आहेत. मी शेठजींकडून कर्ज घेतले होते आणि पुढील जन्मात परत देईल असे सांगितले होते. शेठजींकडून कर्ज घेतल्यानंतर माझा मृत्यू झाला आणि मी गाय बनून येथे आले. आता दूध देऊन कर्ज फेडत आहे. जोपर्यंत कर्जाचे पूर्ण पैसे जमा होत नाहीत, मला येथेच राहावे लागेल. चोर दोन्ही गायीचे बोलणे ऐकून चकित झाला. त्याला काय करावे काही सुचेना. त्याच्या लक्षात आले की, कर्ज घेतल्यानंतर ते फेडावेच लागते मग ते या जन्मात किंवा पुढच्या जन्मात. दुसऱ्या दिवशी चोराने शेठजीचे पैसे परत केले आणि चोरी करणेही सोडून दिले.

तात्पर्य: कधीच इतरांचे वाईट करू नये आणि असे करण्याचा विचारही करू नये.

देवाचा मित्र


एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलाला एक चप्पल विकत घेऊन भेट दिली. मुलगा लहान होता. त्याला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले तो आनंदी झाला आणि म्हणाला, "काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्‍नावर तो सज्जन गृहस्थ म्हणाला, "अरे नाही रे बाळा, मी देव नाही" मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, "काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार. मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार" हे वाक्‍य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

तात्पर्य : ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव ओळखायला शिका

बेडकाची परीक्षा


एका बेडकाची पाण्यात परीक्षा घ्यायचे ठरवतात बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले अपेक्षा होती की पाण्याचे तापमान वाढल्यावर बेडूक उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले आतातरी अपेक्षा होती की बेडूक उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले पण तसे काही घडेना शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला. तुम्हाला वाटेल की बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला.

पण तसे नव्हते बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते त्यामुळे पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान कमी-जास्त करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे  पाण्याचे तापमान जसजसे वाढत होते बेडूक त्याच्या शरीराचे तापमान वाढवण्यात ताकद लावत होता एका तापमानानंतर त्याची सगळी शक्ती संपली म्हणजे त्याने बाहेर उडी मारून येण्याची ताकद पण वापरून टाकली त्यामुळे उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही आणि तो मरण पावला

तात्पर्य:- तुमच्याकडे असलेल्या सहनशीलतेचा किंवा सहिष्णुतेचा उपयोग कसा करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवायचे.

माणुसकी

कल्की नावाचा माणूस एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करत होता एक दिवस कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून कल्की बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करता करता खूप उशीर झाला त्याच्या लक्षात आले नाही की तोपर्यंत सगळे लाईट आणि दरवाजे बंद करून घरी गेले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते. कल्कीला काही सुचेनासं झालं, पण थोड्याच वेळात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. कंपनीच्या बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, "तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय." सुरक्षा रक्षक म्हणाला, "या कंपनीमध्ये तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येता जाताना नमस्कार करतात आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो."

तात्पर्य : माणुसकी कधी कामाला येईल सांगता येत नाही 

Tuesday, October 15, 2019

Life

Life is nothing but an unknown world and you have to survive into it
Sometimes you feel, you know it and sometimes you find yourself as stranger
But no one can guess what will happen in the next moment
Coz it is the unknown path in every moment in the unknown world


Life is nothing but a mirror and you have to see yourself into it

Sometimes it will show your beauty and sometimes it will show your ugliness
But don’t be egoist by your beauty and don’t be frustrate by your ugliness
Coz it will just show you how you want to see yourself into it


Life is nothing but a garden of emotions and you have to feel it

Sometimes you find nice smell of flowers and sometimes you will hate it
But try to get better things from it and leave the things, which you don’t like it
Coz it is just a matter of taste that can be change by person to person


Life is nothing but a share of sensations and you have to share it

Sometimes you will find the happiness and sometimes you will find sorrow
But try to enjoy the happiness and forget to sorrow
Coz they are nothing but the time being emotions, which are changes with the time,


Life is nothing but a moment and you have to live it

Sometimes it can be a tiny and sometimes it can be so big which never ends,
But it is all depends on how you look towards it
Coz it is just a moment, which you live in happiness and sorrow


Life is nothing but a game and you have to play game,

Sometimes you will win it and sometimes you will loose the game
But please don’t just play the game and please don’t take it lightly
Coz you to have to play the Game; to Win the Game, to Win the Game, to Win the Game ………..


Note : Please ignore the grammar mistake as I like its originality since I wrote it


उड्डान ( IBM poetry competition winning poem)



ऊपर  गगन  विशाल  और  मन  में  गगन  को  छुने की   चाहत  रखता  हूँ,
मेरी  मंजिल  है  बहुत  दूर  और  खुद्द  के  पंख   दुर्बल  पाता  हूँ,
पर  गगन  को  छुने  का  जीवन  में  एक  लक्ष  रखता  हूँ,
और  मै भी  मै  ही  हूँ , जो  कभी  जीवन  में  हर  नही  मानता हूँ,

एक  नए  इरादे  के  साथ  आकाश  में  उड्डान  करता  हूँ,
पर  पंख  दुर्बल  होने  के  कारन  फिर  से  जमीन  पर  गिरता  हूँ,
शरीर  से  छिन्न-भिन्न  और मन  से  घायल  हो  जाता  हूँ,
पर  गगन  को  छुने  की  चाहत  कम    होने  देता  हूँ,
और  मै भी  मै  ही  हूँ , जो  कभी  जीवन  में  हर  नही  मानता हूँ,

इसिलिये  हर बार  पहलेसे  ज्यादा  ऊँची  उड्डान  भरता  हूँ,
हर  बार  पहलेसे  ज्यादा  ऊंचाई  से  जमीन  पर  गिरता  हूँ
( पहलेसे ज्यादा  ऊंचाई  से  गिराने  के  कारन ) हर  बार पहलेसे ज्यादा  चोट  पाता  हूँ,
पर  मै भी  मै  ही  हूँ , जो  कभी  जीवन  में  हर  नही  मानता हूँ,
और फिर  से  एक  नई  प्रेरणा  भरकर  (एक  नए  इरादे  के  साथ)  आकाश  मे उड्डान करता  हूँ


आयुष्याचे काही क्षण

आयुष्य  कधी  उन्हाचे  चटके  तर  कधी  मायेची  सावली  देऊन  गेले,
कधी  गुलाबाचे  काटे  तर कधी  पाकल्यांची झालर देऊन गेले,
कधी  सप्तरंगी  इन्द्रधनुष्य  तर  कधी  आभाळाची सावट देऊन  गेले,
जगण्याची  मजा  कशी  जगण्यात  आहे  त्याची  शिकवण देऊन  गेले 
आयुष्य  जगायाचे  मला  शिकवून  गेले

आयुष्याचे काही  क्षण  हसू  तर  काही  क्षण  आसवे  देऊन  गेले,
कधी  वसंत कधी  शिशिर  तर  कधी  मातीचा  सुगंध  (आयुष्यात) दरवळून गेले,
क्षण  भंगुर  ते  सारे काही  क्षणात  विसरून  गेले,
पण  प्रतेक  वेळेस काही  नवीन (शिकवण) देऊन  गेले,
आयुष्य  जगायाचे  मला  शिकवून  गेले

आयुष्य  कधी  लख्ख  प्रकाश  तर  कधी  अंधारमय  होऊंन  गेले,
कधी  हळूवार  वा़ऱ्याचा झोका  तर  कधी  वादळी  रात्र  होऊंन  गेले,
रात्र  वादळी  होती  पण  लढणयाची ताकद  मला  देऊन  गेले,
नवीन  जगण्याची  आशा  मला  देऊन  गेले,

आयुष्य मला जगायाचे  शिकवून  गेले......आयुष्य मला जगायाचे  शिकवून  गेले

प्रेम



प्रेम  हा  शब्द  उच्चारल्या बरोबर आपल्या  डोक्यात  बऱ्याच  गोष्टी  येऊन  जातात . बऱ्याच  गोष्टी  आपल्या  डोळ्या  समोरून  फिरायला  लागतात , प्रत्येक  जण  आपल्या  परीने  त्याची  व्याख्या  करतात प्रत्येकासाठी   जरी  त्याची  व्याख्या जरी  वेगळी  असली  तरी  त्याची  भावना  सगळ्याची  सारखीच  असते . प्रेम  म्हंटल्यावर  आपल्या  डोळ्यासमोर  प्रथम  पहिले  प्रेम  येते . प्रेम  म्हणजे  काय  हे  आहे  हे  कोणी  सांगून  कळत  नाही  जशी  एखाद्या  पदार्थाची  चव  घेतल्या  शिवाय  त्याची  चव  कळत  नाही  तसेच  प्रेमाचे  आहे  त्याची  प्रचिती  येण्यासाठी  ते  करावेच  लागते  आणि  ते  किती  कठीण  असले  त्यात  कितीही  त्रास  असला  तरीही  ज्याने  प्रेम  केले  आहे  तो  एवढेच  म्हणेल  की  माणसाने  एकदा  तरी  आयुष्यात  प्रेम  केले  पाहिजे .

पहिले  प्रेम  हा  एक  संशोधनाचा  विषय  आहे . कारण  आपल्याला  पहिले  प्रेम  कधी  होईल  कुठे  होईल  कोणत्या  क्षणी  होईल  कुठे  होईल  कोणत्या  वयात  होईल  काही काही  सांगता  येत  नाही . पण  जेंव्हा  पण  हे  होते  याची  प्रचिती  यायला  लागते . कोणाला  काय  जाणवेल  हे  सांगता  नाही  पण  आयुष्य  बदलले  आहे  हे  त्याला  जाणवायला  लागते . त्याला  प्रियकराशी  बोलावेसे  वाटते , त्याच्या  जवळ  राहावेसे  वाटते .काही  जण  याला  प्रेम  म्हणतात  तर  काही  जण  वयाचा  दोष . कारण  जर  हे  प्रेम  जर  वयाच्या  15-16 वयात  झाले  तर  काही  लोक हा  वयाचा  दोष  म्हणतात . मला  फारसे  कळत  नाही  कारण  जेवढे  लोक  तेवढे  तर्क  आणि  तेवढ्या  वेगळ्या  गोष्टी .प्रत्येक  जण  आपल्या  अनुभवानुसार  आपल्या  प्रेमाची  व्याख्या करतात त्यामुळे  प्रेमाची  व्याख्या  निरनिराळ्या  लोक  कडून  वेगळी  ऐकायला  मिळे  पण  खरे  एवढेच  आहे  ही   जरी  शब्द  वेगळे  असते  तरी  प्रत्येकाची  भावना  एकाच  असते

प्रेम  हे  जीवनात  एकदाच  होते  का  हा  मला  पडलेला  प्रश्न . कारण  ज्याचे  पहिले  प्रेम  यशस्वी  झाले  तर  तो  दुसरी  कडे  वळले  नाही  पण  ज्याचे  प्रेम  अयशस्वी  होते  त्याला  फार  वाईट  वाटते काही  लोक  त्या  वाटे  वरून   परत  चालायचेच  नको  म्हणून  परत  त्याच्या  कडे  पाठ  फिरवतात  पण  काही  लोक  परत  आपले  आयुष्य  नव्याने  चालू  करतात . अशावेळी  ते  परत  नवीन  जोडीदाराच्या  शोधात   असतात . काही  जणांना  परत  नवीन  जोडीदार  मिळतोही  काही  जणांना  वाटते  की  हे  प्रम  पहिल्या  पेक्षा  खरे  आहे  आणि  ते  परत  नव्याने  आयुष्य  चालू  करतात . पण  मला  हा  प्रश्न  पडतो  की   खरंच  ते  प्रेम  असते  का  ती  तडजोड  असते  कारण  आपल्याला  नवीन   आयुष्य  चालू  करायचे  असते . काही  जणांना  त्या  प्रेमाची  जास्त  जवळीक  वाटते  कारण  कदाचित  काही  जणांचे  दुसरे  प्रेम  यशस्वी  होते  पण  काही  जणांचे  ते  पण  अयशस्वी  होते . मग  काय  करावे  हा  बऱ्याच  जनावर  प्रश्न  पडतो . काही  जण  त्यातून  पण  परत  सहीसलामत बाहेर येतात आणि  नव्याने  आयुष्य  चालू  करतात . मी  इथे  फक्त  त्या  लोकसाठी  बोलतो  आहे  जे  लोक  जीवनकडे  पॉसिटीव्ह  दृष्टीने  बघतात  म्हणजे  जरी  त्यांचे  पहिले  किंवा  दुसरे  प्रेम  अयशस्वी  झाले  तरी  ते  परत  नव्याने  आयुष्य  चालू  करण्या  मध्ये  विश्वास  ठेवतात .

मला  वाटते कि  खरे  प्रेम  हेच  आहे  कि  जे  यशस्वी  होऊ  ना होऊ  ते  नवीन  जगायला  प्रेरणा  देते . ते  आपल्याला  जे  अनुभव  येतात  ये  चांगले  पण  असतात  आणि  वाईट  पण  असतात.  पण  प्रेम  हे  आपल्याला  चांगले  घेऊन  वाईट  विसरायला  मदत  करते . आयुष्यकडे नवीन दृष्टीने बघायला शिकवते ते आपल्या भाग्याला दोष देत बसत नाही ते जे मिळेल त्या कडे पॉसिटीव्ह दृष्टीने बघून आपले नवीन आयुष्य जगायला लागतात. त्यामुळे  जो  जीवन  कडे  पॉसिटीव्ह दृष्टीने  बघतो  मला  वाटते  तो   खरंच  प्रेम  करण्याची ताकद  पण  ठेवतो  आणि  दुसऱ्यासाठी  आदर्श  पण  निर्माण  करतो .
                        
                     आयुष्याचे  काही  क्षण

आयुष्य  कधी  उन्हाचे  चटके  तर  कधी  मायेची  सावली  देऊन  गेले,
कधी  गुलाबाचे  काटे  तर कधी  पाकल्यांची झालर देऊन गेले,
कधी  सप्तरंगी  इन्द्रधनुष्य  तर  कधी  आभाळाची सावट देऊन  गेले,
जगण्याची  मजा  कशी  जगण्यात  आहे  त्याची  शिकवण देऊन  गेले 
आयुष्य  जगायाचे  मला  शिकवून  गेले

आयुष्याचे काही  क्षण  हसू  तर  काही  क्षण  आसवे  देऊन  गेले,
कधी  वसंत कधी  शिशिर  तर  कधी  मातीचा  सुगंध  (आयुष्यात) दरवळून गेले,
क्षण  भंगुर  ते  सारे काही  क्षणात  विसरून  गेले,
पण  प्रतेक  वेळेस काही  नवीन (शिकवण) देऊन  गेले,
आयुष्य  जगायाचे  मला  शिकवून  गेले

आयुष्य  कधी  लख्ख  प्रकाश  तर  कधी  अंधारमय  होऊंन  गेले,
कधी  हळूवार  वा़ऱ्याचा झोका  तर  कधी  वादळी  रात्र  होऊंन  गेले,
रात्र  वादळी  होती  पण  लढणयाची ताकद  मला  देऊन  गेले,
नवीन  जगण्याची  आशा  मला  देऊन  गेले,

आयुष्य मला जगायाचे  शिकवून  गेले......आयुष्य मला जगायाचे  शिकवून  गेले

Monday, September 30, 2019

परीस


कल्की नावाचा एक माणूस परीस शोधायला निघतो परिसाची परीक्षा घेण्यासाठी तो रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा आणि गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला बरेच दिवस गेले महिने लोटले वर्षे सरली पण त्याच्या दिनक्रमात काही बदल झाला नाही त्याचा रोजचा कार्यक्रम झाला होता की दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा शेवटी कल्की आता म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो आपला शेवटचा श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले ती साखळी सोन्याची झाली होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही कधी त्याच्या हातात परीस आला होता आणि त्यांनी तो दगड म्हणून फेकून दिला होता.

तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो त्याची किंमत करा

Sunday, September 29, 2019

पोस्टमन - 3


एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. त्याच गावात एक दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी राहत होती एक दिवस त्या मुलीने पोस्टमन अनवाणी पायाने आलेला पहिला आणि त्याला दिवाळीची भेट म्हणून सुंदर चप्पला दिल्या.

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून  कर्ज हवे आहे"  साहेब म्हणाला,  "अरे आधीच तू कर्जाच्या ओझ्याने एवढा एकला आहे आणि पुन्हा आता पुन्हा कर्ज कशाला? पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत." साहेब म्हणाले  "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी? पोस्टमन म्हणाला "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे." साहेबासह सर्व स्टाफ स्तब्ध झाला

ताप्तर्य : चांगल्या कामाचे फळ नेहमीच मिळते

पोस्टमन - 2


एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. त्याच गावात एक दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी राहत होती असेच अधून मधून तिची पत्र यायची तिला दार उघडायला वेळ लागला तरी पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली.. तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

इतर दिवाळीसारखे पोस्टमनने गावात इतरांकडे बक्षिशी मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण बॉक्स घरी जाऊन उघडा त्याने घरी जाऊन पहिले तर त्यात सुंदर चप्पला होत्या आणि त्या त्याने घालून पहिल्या तर त्या बरोबर त्याच्या मापाच्या होत्या ते पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

ताप्तर्य : नाती ही भावनेतून फुलतात

पोस्टमन - 1


एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन" आतून एका मुलीचा आवाज आला, "जरा थांबा, मी येतेय.." दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे.." आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा,मी नंतर घेते.." पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल." पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमनला धक्काच बसला दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

ताप्तर्य : कॊणत्याही निष्कर्षावर लगेच येऊ नका


सेवा


गंगेच्या काठी गौतम कृषींचा आश्रम होता. त्यांच्या जवळ ३ शिष्य होते प्रेम, श्याम, आणि कश्यप ते एक दिवस गौतम कृषीकडे जातात आणि विचारतात गुरुजी आम्ही तीघे ही तुमची सारखीच सेवा करतो पण आमच्यात सगळ्यात सर्वश्रेष्ठ शिष्य कोण आहे गौतम कृषी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे उत्तर द्यायचे सांगून त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी बोलावतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते येतात गौतम कृषी त्यांना पाण्याचा एक जादूची लोटी देतात ज्याचे पाणी कधीच संपत नसते ते त्याना सांगतात की तुम्ही गावात दुष्काळ पडला आहे त्यामुळे तुम्ही गावात जा आणि जास्तीत जास्त लोकांना पाणी देऊन या ते गुरुजींचा निरोप घेऊन जातात त्यातील प्रेम आणि श्याम विचार करतात की गावात जे काही लोक आहेत ते गावाच्या वेशे वरूनच आत जातील त्यामुळे आपण येथे बसूनच पाणी वाटप करू पण कश्यप गावात जाऊन जेवढे लोक मिळतील त्याना पाणी दिलेच पण घराघरात जाऊन पाणी वाटप केले ते तेघेही संघ्याकाळी परत येतात आणि गौतम कृषी कश्यपला सर्वश्रेष्ठ शिष्य जाहीर करतात

त्यावेळेस प्रेम आणि श्याम त्यांना विचारतात की आम्हीपण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कष्ट केले मग कश्यप सर्वश्रेष्ठ शिष्य कसा? त्यावर गौतम कृषी म्हणतात तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी देत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने घरोघरी जाऊन लोकांना जागेवर पाणी दिले त्यामुळे ते असत लोक पर्यंत पोचले आणि त्यामुळे त्याची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे

तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते.

यशोविजय पंडित

आजपासून तीन शतकांपूर्वी यशोविजय नावाचा एक विख्‍यात प्रकांड पंडित होऊन गेला. तो अनेक विषयांत निपुण होता. त्‍याच्‍या बाबतीत असे सांगण्‍यात येते की एकदा त्‍याला पंडीतांमार्फत एक विषय देण्‍यात आला होता. त्‍या विषयानुसार तो संस्‍कृतमध्‍ये बोलत राहिला. मात्र हळूहळू त्‍याला आपल्‍या पांडित्‍याचा गर्व होऊ लागला. व्‍याख्‍यानाच्‍यावेळी त्‍याच्‍या सांगण्‍यावरून त्‍याचे शिष्‍य चारही बाजूंनी झेंडे लावत असत. याचा अर्थ असा की, चारही दिशांमध्‍ये त्‍याचे नाव झाले आहे.

विद्वत्ता आणि सफलता याचे प्रदर्शन अन्‍य शिष्‍यांना योग्‍य वाटत नव्‍हते. पण त्‍याला विचारण्‍याचे कोणीच धाडस करत नव्‍हते. एकेदिवशी एका शिष्‍याने त्‍याला मोठ्या हुशारीने विचारले, ''गुरुदेव, आपले पांडित्‍य धन्‍य आहे, मी मोठा भाग्‍यवान आहे की आपल्‍यासारख्‍या महापुरुषाचे दर्शन मला झाले, आपल्‍या सत्‍संगाचा लाभ झाला. एक प्रश्‍न मला बरेच दिवसापासून पडतो आहे पण धाडस करून हे विचारतो की, आपण जर इतके विद्वान आहात तर आपले गुरु व गुरुंचे गुरु किती मोठे विद्वान होते?'' पंडीत म्‍हणाले,''मी तर त्‍या दोघांपुढे काहीच नाही. त्‍यांच्‍या चरणाच्‍या धुळीइतकेसुद्धा मला ज्ञान नाही'' शिष्‍य म्‍हणाला,'' ते इतके विद्वान होते तर तेसुद्धा आपल्‍यासारखेच चारी बाजूंना झेंडे लावत असत का?'' पंडीताला आपली चूक समजली व त्‍याचे हृदय अहंकाररहित झाले.

तात्‍पर्य: अहंकाराने बाधित ज्ञान सर्वनाशाला कारणीभूत ठरते. 

मानवता


जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. एक दिवस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट आणि दुसरेही संत आले होते त्यांना हिरेजडीत मुकुट देण्यात आला. हे पाहून त्या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले, ’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते.

जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह मध्ये इतका आनंदी होतो की मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही

तात्‍पर्य:-ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.

व्‍यवहारज्ञानाचे धडे

एका शहरात दररोज संध्‍याकाळी एक महात्‍मा प्रवचन देत असे. त्‍यांची ख्‍याती एका धान्‍याच्‍या व्‍यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्‍या मुलासोबत प्रवचन ऐकण्‍यास आला. प्रवचन सुरु झाल्‍यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्‍या गोष्‍टी सां‍गत असताना ते म्‍हणाले,''या जगात जितके प्राणी आहेत. त्‍या सर्वांमध्‍ये आत्‍मा वावरत असतो.'' ही गोष्‍ट व्‍यापा-याच्‍या मुलाला हृदयस्‍पर्शी वाटली. त्‍याने मनोमन हा विचार आचरणात आणण्‍याचा संकल्‍प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्‍हा त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याला काही वेळ दुकान सांभाळण्‍यास सांगितले. ते स्‍वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्‍यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्‍य खाऊ लागली.


मुलाने त्‍या गायीला हाकलण्‍यासाठी लाकूड उचलले पण त्‍याच्‍या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्‍य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्‍यापारी तेथे आले त्‍याने गायीला धान्‍य खाताना पाहून मुलाला म्‍हणाले,'' अरे तुझ्यासमोर ती गाय धान्‍य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्‍यासारखा गप्‍प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्‍पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?'' मुलगा म्‍हणाला,'' बाबा, काल तर महाराज म्‍हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्‍ये पण एक जीव पाहिला'' तेव्‍हा व्‍यापारी म्‍हणाले,''मूर्खा, अध्‍यात्‍म आणि व्‍यापार यात गल्‍लत एकसारखे करायची नसते.''

तात्‍पर्य :- सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्‍यास जीवन सुखदायी होते

धन, यश आणि प्रेम


संध्याकाळी महिलेचा पती आणि मुलगी घरी आले. महिलेने पतीला दुपारी घरी घडलेला प्रसंग सांगितला. पतीनेही साधूंना जेवणासाठी बोलावण्यास होकार दिला. त्यानंतर महिला तिन्ही साधूंना बोलावण्यासाठी गेली. साधू म्हणाले आणि तिघेही एकत्र कोणाच्याही घरी जात नाहीत. महिलेने विचारले असे का महाराज? साधू म्हणाले आमची नावे धन, यश आणि प्रेम अशी आहेत. तुम्ही तुमच्या पतीला विचारून यावे की, आमच्या तिघांपैकी ते कोणाला घरी बोलावण्यास इच्छुक आहेत. महिला पुन्हा घरी आली आणि पतीला सर्व गोष्ट सांगितली.

तो म्हणाला आपण जर धनाला घरी बोलावले तर आपण धनवान होऊ ती म्हणाली आपण जर यशला घरी बोलावले तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपली गरिबी दूर होईल. तेवढ्यात या दोघांची मुलगी म्हणाली आपण जर प्रेमला घरी बोलावले पाहिजे. प्रेमापेक्षा मोठे या जगात काहीच नाही. पती-पत्नीने मुलीचा सल्ला मान्य केला. महिला साधुंकडे गेली आणि प्रेमला घरी जेवणासाठी आमंत्रण दिले. त्यानंतर प्रेम नावाचे साधू महिलेसोबत घरात येऊ लागले आणि त्यांच्या मागे दोन साधुही निघाले. महिला म्हणाली, महाराज तुम्ही तर म्हणाला होतात की आम्ही एकत्र कोणाच्याही घरी जात नाहीत मग आता एकत्र का येत आहात? साधू म्हणाले, जर तुम्ही धन किंवा यश या दोघांपैकी एकाला बोलावले असते तर तुमच्या घरी एकच साधू आले असते. परंतु तुम्ही प्रेमला आमंत्रण दिले आहे. जेथे प्रेम असते तेथे धन आणि यश आपोआप येतात.

ताप्तर्य : ज्या घरामध्ये प्रेम राहते तेथे सुख, शांती आणि संपन्नता राहते

नेहमी पॉसिटीव्ह रहा

छोट्या बेटावर एकच माणूस जिवंत होता. त्याने रोज देवाला प्रार्थना केली की त्याला सोडविण्यासाठी कोणालातरी पाठवावे. दररोज त्याने देवाकडे मदत मागितली पण कोणीच येत नाहीत दरम्यान थकून . त्याने स्वत: चे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या काही वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी एक झोपडी बांधली एक दिवस तो अन्नाचा शोधून परत येत असताना त्याला त्याची झोपडी जळताना दिसते

सर्वात वाईट गोष्ट अशी होती की त्याच्या मालकीच्या सर्व वस्तू जळाल्या होत्या तो गोंधळलेला होता आणि देवावर चिडून त्याने देवाला विचारले, "तू असे का केलेस?" आणि तो वाळूवर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बेटाशेजारील बोटीचा आवाज ऐकू आला. ते सुटका करणारे होते. त्याने त्यांना विचारले की तो तेथे आहे हे त्यांना कसे समजले? बचावकर्त्यांनी त्याला सांगितले की त्यांनी धुराचा सिग्नल पहिला.

तात्पर्य   : आपल्या घडणार्‍या प्रत्येक नकारात्मक गोष्टींबद्दल आपण स्वतःला सांगावे, यात देवाला काहीतरी चांगले घडवायचे आहे

तीन झाडे


एकदा एका जंगलात तीन झाडे होती. हे तिघेही त्यांच्या आनंद, दु: ख आणि स्वप्नांबद्दल एकमेकांशी बोलत असत. एक दिवस पहिले झाड म्हणाले "मला दागिन्यांची खूप मोठी पेटी व्हायचे आहे" दुसरे झाड म्हणाले "मला एक मोठे जहाज बनायचे आहे” शेवटी तिसरा झाड म्हणाले "मला या जंगलातील सर्वात उंच आणि सर्वात मोठा वृक्ष व्हायचा आहे." एक दिवस त्या जंगलात ३ वुडकटर येतात आणि तिन्ही झाडांना कापून नेतात

पहिले झाड सुतार खरेदी करून त्यापासून गुरांसाठी फीड फीडर बनवतो त्या बिचाऱ्या झाडाला याची कल्पनाही नव्हती. दुसरे झाडापासून लहान मासेमारी नौका बनवितात. दुसऱ्या झाडाचे पण स्वप्न चिरडले जाते. तिसऱ्या झाडाचे पण मोठे मोठे तुकडे करून एका काळ्या कोठीत बंद करतात

एके दिवशी एक माणूस त्या सुताराकडे येतो त्याची बायको एका मुलाला जन्म देते त्या फीड फीडर पासून त्या बाळासाठी पाळणा बनवतात पहिल्या झाडाला आपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते काही वर्षांनंतर काही तरुणांनी दुसर्‍या झाडापासून बनवलेल्या नावेत मासेमारी करण्यासाठी नेतात आणि तेथे अचानक वादळ येते आणि नावेतील सगळ्या लोकांना वाटते आता कोणीही जगात नाही पण त्यातला एक तरुण उठतो आणि वादळाला शांत होण्यासाठी आदेश देतो आणि वादळ शांत होते  दुसऱ्या झाडाला आपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते तिसऱ्या झाडावर एका जखमी माणसाला बांधून त्याच्या दिनही हातावर खिळे ठोकून एका डोंगरावर नेतात तिथे त्या झाडाला स्वर्गाची अनुभूती होते आणि नंतर त्याला कळते तो माणूस येशू असतो तिसऱ्या झाडालाआपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते

निष्कर्ष: -  जे काही होते ते चांगल्यासाठीच होते

Saturday, September 28, 2019

स्वप्न - मर्सिडिस कार

कल्की हा त्याच्या संघर्षग्रस्त जीवनामुळे अतिशय निराश व्यक्ती आहे. जरी त्याच्यात इतरांपेक्षा जास्त क्षमता होती तरी तो जीवनात लहान लहान गोष्टींसाठी संघर्ष करीत असतो. त्याला वाटत असते की त्याच्या पेक्षा तुलनेने कमी क्षमतेचे लोक अधिक यशस्वी होतात पण त्याला मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याला वाटते की तो सध्याच्या आयुष्यापेक्षा अधिक चांगले जीवन जगण्यासाठी पात्र आहे म्हणून एक दिवस तो काही तज्ज्ञांच्या मदतीचा विचार करतो त्याला वाट असते की जेव्हा आपली गाडी बंद पडते तेव्हा आपण ती गॅरेजमध्ये घेऊन जातो, जेव्हा आपले आरोग्य समस्या निर्माण करते तेव्हा आपण डॉक्टर कडे जातो म्हणजे त्याला तज्ज्ञांच्या मदतीची आवश्यकता आहे. तो मदत शोधण्यास सुरुवात करतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो तज्ज्ञांच्या शोधात घर बाहेर पडतो.  तज्ज्ञांच्या शोधात असताना त्याला कळते की सोल्युशन बाबा नावाचा एक व्यक्ती आहे जो व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून तो सोल्यूशन बाबा कडे समस्या चे निराकरण करण्यासाठी जातो. तो त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तो त्याच्यात इतर यशस्वी लोकांच्या तुलनेत चांगली गुणवत्ता आणि क्षमता आहे म्हणून तो आतापेक्षा चांगल्या स्थितीत जीवन जगण्यास पात्र आहेत. सोल्यूशन बाबा काही काळासाठी विचार करातात आणि त्याला विचारतात की तुझ्या मते यशस्वी होणे म्हणजे काय आहे? कल्की त्यांना सांगतो की मर्सिडीझ कार हे यशस्वी व्यक्तीचे चिन्ह आहे. जेव्हा लोक एखाद्याला मर्सिडिजची कार मध्ये पाहतात तेव्हा लोक म्हणतात की तो एक यशस्वी व्यक्ती आहे. श्री सोल्यूशन बाबा त्याला सांगतात की आज पासून एका वर्षाच्या आत तुला मर्सिडीज मिळेल.

कल्की तो संवाद फारसा मनावर न घेता नेहमीप्रमाणे जीवन जगण्यास सुरवात करतो. काही दिवस निघून गेल्यावर कल्की च्या मनात सहज येते की माझ्या आयुष्यात किंवा आर्थिक स्थितीत काहीही बदल झालेला नाही त्यामुळे मी वर्षभरात मर्सिडीजची कार कशी मिळवू शकेन पण अचानक त्याने दुसरा विचार केला की जर काही चमत्कार घडला आणि जर त्याला संधी दिली की त्याच्या समोर असलेल्या कारमधून एक मर्सिडीजची गाडी निवड कर तर मला त्यातली सगळ्यात चांगली मर्सिडीझची कार कशी ओळखता येईल. मग मर्सिडीजच्या कारमध्ये कोणता कलर उत्कृष्ट दिसतो, कोणत्या प्रकारचे मॉडेल चांगले दिसते, त्यांच्या किमती काय आहे, इत्यादी. मर्सिडीजच्या कारचा अभ्यास करताना त्याला कळते की मर्सिडीज मध्ये वेगवेगळ्या श्रेणी आहेत उदा.  ए, बी, सी, डी, इ, इत्यादी मग तो विचार करतो की जर कधी आपल्या समोर काही मर्सिडीज मधून सर्वोत्तम निवडण्याची संधी मिळाली तर आपण कशी निवडू त्यासाठी मापदंड काय असतील मग त्या उपलब्ध पर्यायांमधून सर्वोत्कृष्ट प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये तो अजून खोलात जाऊन अभ्यास सुरू करतो.

अभ्यास करत असताना त्याला एक कल्पना सुचते की यातील वाहनाचा एक भाग जर मी बदलला तर गाडीचा खप वाढू शकेल तो ते संशोधन मर्सिडिज कारच्या व्यवस्थापनाकडे घेऊन जातो आणि मर्सिडिज कारचा संशोधन विभाग त्याचा अभ्यास करतात आणि त्यांना त्यात तथ्य सापडते त्यामुळे मर्सिडिज कारचे व्यवस्थापन त्याला बोलवून त्याचे कौतुक करतात आणि त्यांना संशोधन विभागाचे प्रमुख स्थान देऊन आणि त्यांना "मर्सिडीज कार" भेट देतात
.
तात्पर्य: मोठे स्वप्न बघा आणि त्यानुसार अंमलबजावणी करा