Sunday, September 29, 2019

सेवा


गंगेच्या काठी गौतम कृषींचा आश्रम होता. त्यांच्या जवळ ३ शिष्य होते प्रेम, श्याम, आणि कश्यप ते एक दिवस गौतम कृषीकडे जातात आणि विचारतात गुरुजी आम्ही तीघे ही तुमची सारखीच सेवा करतो पण आमच्यात सगळ्यात सर्वश्रेष्ठ शिष्य कोण आहे गौतम कृषी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे उत्तर द्यायचे सांगून त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी बोलावतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते येतात गौतम कृषी त्यांना पाण्याचा एक जादूची लोटी देतात ज्याचे पाणी कधीच संपत नसते ते त्याना सांगतात की तुम्ही गावात दुष्काळ पडला आहे त्यामुळे तुम्ही गावात जा आणि जास्तीत जास्त लोकांना पाणी देऊन या ते गुरुजींचा निरोप घेऊन जातात त्यातील प्रेम आणि श्याम विचार करतात की गावात जे काही लोक आहेत ते गावाच्या वेशे वरूनच आत जातील त्यामुळे आपण येथे बसूनच पाणी वाटप करू पण कश्यप गावात जाऊन जेवढे लोक मिळतील त्याना पाणी दिलेच पण घराघरात जाऊन पाणी वाटप केले ते तेघेही संघ्याकाळी परत येतात आणि गौतम कृषी कश्यपला सर्वश्रेष्ठ शिष्य जाहीर करतात

त्यावेळेस प्रेम आणि श्याम त्यांना विचारतात की आम्हीपण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कष्ट केले मग कश्यप सर्वश्रेष्ठ शिष्य कसा? त्यावर गौतम कृषी म्हणतात तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी देत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने घरोघरी जाऊन लोकांना जागेवर पाणी दिले त्यामुळे ते असत लोक पर्यंत पोचले आणि त्यामुळे त्याची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे

तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते.

No comments:

Post a Comment