Thursday, September 26, 2019

स्वर्गातील हार



अकबर त्याच्या लहरी स्वभावासाठी प्रसिद्ध होता एक दिवस त्याला अशीच लहर येते आणि तो दरबारात जाहीर करतो मला स्वर्गातील हार घालायचा आहे सगळे आश्चर्यचकित होतात स्वर्गातील हार कोण आणू शकेल बिरबल हे आव्हान स्वीकारतो आणि काहीही दिवसांनी अकबराकडे एक दोरी घेऊन येतो आणि त्याला सांगतो महाराज मी स्वर्गातील हार घेऊन आलो आहे पण याची खासियत ही आहे की हा हार फक्त पुण्यवान लोकांनाच दिसतो आणि पापी लोकांना हि दोरी दिसते अकबराला दि दोरी दिसत असते पण तो सांगत नाही कारण बिरबलाच्या म्हणण्यानुसार तो पापी ठरला असता मग तो विचार करतो की आपण दरबारात जाऊन याची परीक्षा घेऊ पण दरबारात पण सारखेच होते सगळ्यांना ती दोरी दिसत असते पण कोणाचीच खरं सांगायची धास्ती होत नव्हती आणि सगळे त्याला हार समजून शांत बसतात

तात्पर्यः नेहमी असेच होते सत्याला दाबून टाकायचा प्रयत्न केले जातात

No comments:

Post a Comment